मुंबई। आज राज्यात कोरोनाबाधीत ३२८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३६४८ झाली आहे. आज दिवसभरात ३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३०७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७ हजार ४६८ नमुन्यांपैकी ६३ हजार ४७६ जणांचे कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३६४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८२ हजार २९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६९९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ११ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २११* झाली आहे. (* यापुर्वी ११ एप्रिल रोजी कळवलेला एक मृत्यू कोरोना निगेटिव्ह असल्याचे मुंबई मनपाने कळवल्याने सदर मृत्यू एकूण मृत्यूमधून वगळण्यात आला आहे.) आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई येथील ५ आणि पुणे येथील ४ तर १ मृत्यू औरंगाबाद मनपा आणि १ मृत्यू ठाणे मनपा येथील आहे. त्यात ६ पुरुष तर ५ महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर ६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांपैकी ९ रुग्णांमध्ये (८२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)मुंबई महानगरपालिका: २२६८ (१२६)ठाणे: १८ (२)ठाणे मनपा: ११६ (२)नवी मुंबई मनपा: ६५ (३)कल्याण डोंबवली मनपा: ७३ (२)उल्हासनगर मनपा: १भिवंडी निजामपूर मनपा: ४मीरा भाईंदर मनपा: ६४ (२)पालघर: २१ (१)वसई विरार मनपा: ६२ (३)रायगड: १३पनवेल मनपा: २९ (१)ठाणे मंडळ एकूण: २७३४ (१४२)नाशिक: ३नाशिक मनपा: ५मालेगाव मनपा: ४५ (२)अहमदनगर: १९ (१)अहमदनगर मनपा: ९धुळे: १ (१)धुळे मनपा: ०जळगाव: ०जळगाव मनपा: २ (१)नंदूरबार: ०नाशिक मंडळ एकूण: ८५ (५)पुणे: ११ (१)पुणे मनपा: ५२८ (४९)पिंपरी चिंचवड मनपा: ४५ (१)सोलापूर: ०सोलापूर मनपा: १४ (१)सातारा: ११ (२)पुणे मंडळ एकूण: ६१६ (५४)कोल्हापूर: २कोल्हापूर मनपा: ३सांगली: २६सांगली मिरज कुपवाड मनपा:०सिंधुदुर्ग: १रत्नागिरी: ६ (१)कोल्हापूर मंडळ एकूण: ३८ (१)औरंगाबाद:०औरंगाबाद मनपा: २९ (३)जालना: २हिंगोली: १परभणी: ०परभणी मनपा: १औरंगाबाद मंडळ एकूण: ३३ (३)लातूर: ८लातूर मनपा: ०उस्मानाबाद: ३बीड: १नांदेड: ०नांदेड मनपा: ०लातूर मंडळ एकूण: १२अकोला: ७ (१)अकोला मनपा: ८अमरावती: ०अमरावती मनपा: ६ (१)यवतमाळ: १३बुलढाणा: २१ (१)वाशिम: १अकोला मंडळ एकूण: ५६ (३)नागपूर: २नागपूर मनपा: ५८ (१)वर्धा: ०भंडारा: ०गोंदिया: १चंद्रपूर: ०चंद्रपूर मनपा: २गडचिरोली: ०नागपूर मंडळ एकूण: ६३ (१)इतर राज्ये: ११ (२)एकूण: ३६४८ (२११)(या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा, मनपांनी उपलब्ध करून दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३४४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ५९९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २३ लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
आज राज्यात ११ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २११* झाली आहे. (* यापुर्वी ११ एप्रिल रोजी कळवलेला एक मृत्यू कोरोना निगेटिव्ह असल्याचे मुंबई मनपाने कळवल्याने सदर मृत्यू एकूण मृत्यूमधून वगळण्यात आला आहे.) आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई येथील ५ आणि पुणे येथील ४ तर १ मृत्यू औरंगाबाद मनपा आणि १ मृत्यू ठाणे मनपा येथील आहे. त्यात ६ पुरुष तर ५ महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर ६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांपैकी ९ रुग्णांमध्ये (८२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)मुंबई महानगरपालिका: २२६८ (१२६)ठाणे: १८ (२)ठाणे मनपा: ११६ (२)नवी मुंबई मनपा: ६५ (३)कल्याण डोंबवली मनपा: ७३ (२)उल्हासनगर मनपा: १भिवंडी निजामपूर मनपा: ४मीरा भाईंदर मनपा: ६४ (२)पालघर: २१ (१)वसई विरार मनपा: ६२ (३)रायगड: १३पनवेल मनपा: २९ (१)ठाणे मंडळ एकूण: २७३४ (१४२)नाशिक: ३नाशिक मनपा: ५मालेगाव मनपा: ४५ (२)अहमदनगर: १९ (१)अहमदनगर मनपा: ९धुळे: १ (१)धुळे मनपा: ०जळगाव: ०जळगाव मनपा: २ (१)नंदूरबार: ०नाशिक मंडळ एकूण: ८५ (५)पुणे: ११ (१)पुणे मनपा: ५२८ (४९)पिंपरी चिंचवड मनपा: ४५ (१)सोलापूर: ०सोलापूर मनपा: १४ (१)सातारा: ११ (२)पुणे मंडळ एकूण: ६१६ (५४)कोल्हापूर: २कोल्हापूर मनपा: ३सांगली: २६सांगली मिरज कुपवाड मनपा:०सिंधुदुर्ग: १रत्नागिरी: ६ (१)कोल्हापूर मंडळ एकूण: ३८ (१)औरंगाबाद:०औरंगाबाद मनपा: २९ (३)जालना: २हिंगोली: १परभणी: ०परभणी मनपा: १औरंगाबाद मंडळ एकूण: ३३ (३)लातूर: ८लातूर मनपा: ०उस्मानाबाद: ३बीड: १नांदेड: ०नांदेड मनपा: ०लातूर मंडळ एकूण: १२अकोला: ७ (१)अकोला मनपा: ८अमरावती: ०अमरावती मनपा: ६ (१)यवतमाळ: १३बुलढाणा: २१ (१)वाशिम: १अकोला मंडळ एकूण: ५६ (३)नागपूर: २नागपूर मनपा: ५८ (१)वर्धा: ०भंडारा: ०गोंदिया: १चंद्रपूर: ०चंद्रपूर मनपा: २गडचिरोली: ०नागपूर मंडळ एकूण: ६३ (१)इतर राज्ये: ११ (२)एकूण: ३६४८ (२११)(या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा, मनपांनी उपलब्ध करून दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३४४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ५९९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २३ लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.