- भाजपा सरकारला शेतकऱ्यांबद्दल अनास्था: शरद पवार यांची टीका - TheAnchor

Breaking

March 14, 2024

भाजपा सरकारला शेतकऱ्यांबद्दल अनास्था: शरद पवार यांची टीका

चांदवड|द्राक्ष, कांदा, कापूस या शेतमालाला भाव मिळत नाही अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पाहिजेत अशी भूमिका घेतली पाहिजे. आज शेतकरी संकटात आहे त्याला भाजपाचे सरकार जबाबदार आहे. अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. चांदवड येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
BJP-governments-disinterest-towards-farmers-Sharad-Pawars-criticism
युपीएचे सरकार असताना शेतकऱ्यांची ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करुन शेतकऱ्यांच्या खांद्यावरचे ओझे उतरवले होते. सध्याच्या भाजपा सरकारची शेतकऱ्यांबद्दल अनास्था असल्यामुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला.